Ad will apear here
Next
अनामिका एक - रूपे अनेक
एक वाक्य समान ठेवून त्यावर वेगवेगळ्या कथा लिहिण्याचे आवाहन रवींद्र भयवाल यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर केले. त्यातून त्यांना १२३ कथा मिळाल्या. त्यातील निवडक २९ कथा ‘अनामिका एक - रूपे अनेक’ या पुस्तकातून वाचायला मिळतात. ‘फार काळ बंद पडलेल्या कै. अभयराव इनामदार स्मृती वसतिगृहात शिशिरातील एका भल्या पहाटे अनामिका आपली लेखणी घेऊन डोकेफोड करीत बसलेली होती. प्रश्न होताच तितका गहन!’ या वाक्याने प्रत्येक कथेची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्त गाव योजनेत सहभागी न होता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंगळूर नवघरे येथील इनामदार हॉस्टेलमध्ये ठेवण्यात येत असे. त्यातून घडलेल्या गमतीजमती ‘खुला आसमा’मध्ये आहेत. ‘मी आधीच सांगितलं होतं’मध्ये हॉस्टेल बंद का पडले, याचे कारण शोधण्यासाठी रात्री हॉस्टेलवर येणाऱ्या अनामिकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडतो. ‘जले मन मेरा’मध्ये रूम नं. १३मधील डिटेक्टिव्ह अनामिका रश्मीच्या आत्म्याला शांत करते. अशा भय, गूढ, विनोदी, रहस्यमय अशा विविध प्रकारच्या गोष्टींतून अनामिकेची अनेक रूपे वाचकांना भेटतात. साहित्यविश्वातील हा एक वेगळा प्रयोग आहे. 

पुस्तक : अनामिका एक - रूपे अनेक
संपादक : रवींद्र भयवाल
प्रकाशन : राजेंद्र प्रकाशन
पृष्ठे : २३४
मूल्य : २६० रुपये

(‘अनामिका एक- रूपे अनेक’ हा कथासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZMECA
Similar Posts
निवडक र. अ. नेलेकर भयकथा किंवा गूढकथा म्हणजे अंधार, काळोख, रात्र, पदकी घरे, रखवालदार, तळघर, मूर्ती, अपुरा प्रकाश असे बरेच काही आठवते आणि त्याहीपेक्षा वाटते ती उत्सुकता आणि भीती. हे सगळे घटक र. अ. नेलेकर यांच्या या भय-गूढकथांमध्ये आढळतात. एकूण १६ कथा या संग्रहात आहेत.
अगा जे घडलेची नाही श्रीराम बापट यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवन मानसशास्त्रीय पद्धतीने समोर आले आहे. पौगंडावस्थेतील तरुणांची मनोवस्था ते श्रद्धा-अंधश्रद्धापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे विषय जसे सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात, तसेच मानवी मनाची गुंतागुंत म्हणून! एकूण २१ कथांचा हा संग्रह आहे.
मसाई पूर्व आफ्रिकेत ब्रिटिशांची अन्यायी व निष्ठूर राजवट आणि तेथील मसाई या स्थानिक जमातीसाठी काम करणाऱ्या जेनिफर निकोल्सन यांच्या लढ्याची कहाणी उमेश कदम यांनी ‘मसाई’ या कादंबरीतून सांगितली आहे.
घरोघरी ‘घरोघरी मातीच्या चुली’ असे म्हणतात. गरीब-श्रीमंत असे कुणीही असले, तरी प्रत्येकाच्या घरातील कहाणी साधारण सारखीच असते. फक्त आपल्यापेक्षा ते कसे सुखी, त्यांना पैशाची ददात नाही, ही भावना सार्वत्रिक असते. हाच धागा माधुरी तळवलकर यांच्या ‘घरोघरी’ या कादंबरीतून दिसतो. उच्चभ्रू देवयानीच्या घरी जाऊन तिचा मसाज करणाऱ्या संगीताची ही कहाणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language